महाराष्ट्रमुंबईराजकीय

मानखुर्द मध्ये पाणी प्रश्न पेटला

मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा

दि. २ ऑक्टोबर. मानखुर्द मधील सोनापूर आणि जनकल्याण सोसायटी या भागात बऱ्याच महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न ही एक मोठी समस्या बनली असून लोक त्रस्त झाले आहेत. अधिकाऱ्यांकडून तांत्रिक कारणे देण्यात येत आहेत. राजकीय लोकांकडूनही आश्वासन देण्यात येत आहेत, परंतु वैतागलेल्या महिलांनी मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्यासमोर हा विषय मांडला तेव्हा त्यांनी स्थानिक शाखाध्यक्ष सनी शिंदे, उप शाखाध्यक्ष जितेंद्र मुढे आणि कैलास खुडे यांना सूचना केल्या त्यावर यांनी प्रसंगी टँकर ही मागवले परंतु परिस्थिती जैसे थे अशीच ठेवून अधिकारी कारणे देत होते, तेव्हा विभाग अध्यक्ष खांडेकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि पत्र देऊन इशारा दिला कि चार दिवसात पाणी पूर्ववत झाले नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाला सामोरे जा, तेव्हा त्वरित अधिकारी कामाला लागले असून चार दिवसात पाणी पूर्ववत होते कि नाही हे पाहणे महत्वाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button