मुंबई

मनसेच्या आक्रमकतेमुळे पालिका  कर्मचारी दिसले नाल्यात! नालेसफाई नाही झाली त्यामुळे कंत्राटदारांची बिले रोखण्याचे मनसेचे आवाहन

मनसेच्या आक्रमकतेमुळे पालिका  कर्मचारी दिसले नाल्यात!

नालेसफाई नाही झाली त्यामुळे कंत्राटदारांची बिले रोखण्याचे मनसेचे आवाहन.

मानखुर्द शिवाजी नगरमधील नाल्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पालिका प्रशासनाने अर्धवट नाल्यांची पुन्हा सफाईस सुरुवात केली. मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी नागरिकांच्या तक्रारीनुसार नाल्यांची प्रत्यक्ष पाहणे केले असता नाले अर्धवट स्थितीत सफाई झालेले आढळून आले होते मनसे विभाग अध्यक्ष यांनी महापालिका एम पूर्व सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांना कंत्राटदारांची बिले रोखण्याची मागणी केली होती. मोठे नाले सफाई व देखभाल विभाग कांजूरमार्ग येथे देखील पत्र व्यवहार केला होता, पत्र व्यवहाराचा पाठपुरावा करताना जगदीश खांडेकर यांनी अधिकारी व मनसे पदाधिकारी यांच्या संयुक्त पाहणे दौऱ्याचे जाहीर आव्हान केले होते. वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांकडून मनसे सोबत संयुक्त पाहणी करण्यात आली असता मनसेच्या दाव्यामध्ये तथ्य आढळून आले. नालेसफाई स्पष्टीकरण देताना मनसे कार्यकर्ते व महापालिका अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद देखील होत होते. मनसेने पुन्हा आक्रमक होऊन नालेसफाईची मागणी उचलून धरली त्यामुळे काल महापालिकेने आपले कर्मचारी नाल्यात उतरून नालेसफाईस पुन्हा सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये समाधान दिसत आहे.

मुंबईच्या मोठ्या नाल्यांचे पाणी व अतिरिक्त पावसाचे पाणी मानखुर्द मार्गे समुद्राला जाऊन मिळते त्यामुळे मानखुर्द शिवाजीनगरच्या नाल्यांची सफाई होणे अत्यंत गरजेचे असते. मानतो शिवाजीनगर मध्ये झोपडपट्ट्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे कायम कचऱ्याची समस्या उद्भवत राहते. स्थानिक नागरिक यांनी मनसे कार्यालय व विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांना आपल्या परिसरातील फोटो पाठवून वस्तुस्थिती दाखवून दिली. महापालिकेने पुन्हा नव्याने नालेसफाईस सुरुवात केली असली तरी मनसेने याबाबत समाधान व्यक्त केले नाही. पावसाळा संपेपर्यंत ठेकेदारांची बिले रोखण्याच्या मागणीस ते कायम आहेत. मानखुर्द शिवाजीनगर मधील पुराचा व जलभराव चा इतिहास पाहता येते अनेकदा मालमत्ता व विविध हानी झाल्याच्या घटना आहेत त्यामुळे ज्या नाल्यांचे फोटो मनसेने महापालिका अधिकाऱ्यांस सादर केले आहेत त्या नाल्यांमुळे जलभराव किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित ठेकेदारावर मालमत्ता व जीवितहानीचा गुन्हा देखील नोंदवावा ही मागणी मनसेने लावून धरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button